Friday, December 28, 2007

गुजरातचा "आँखो देखा हाल'!


कार्यशैलीमुळेच मोदींचा विजय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून गुजरातमध्ये कारकीर्द सुरू करणाऱ्या "त्या' तरुणाला संघ कार्यालयातील खोली विशेष पसंत नव्हती. त्याला खोली एका "इंटिरियर डिझाईनर'कडून सजवून घ्यायची होती. मात्र, वरिष्ठांनी "त्या' प्रचारकाला खोलीच्या सुशोभीकरणाची परवानगी नाकारली. ""कार्यालयात रहायचे असेल, तर प्रचारकाप्रमाणे व्यवहार असला पाहिजे,'' असे चार खडे बोलही सुनावल्याचे संघाचे जुने कार्यकर्ते सांगतात. वरिष्ठांचा मान राखत "त्या' प्रचारकाने आपल्या इच्छेला मुरड घातली व संघप्रचारकाला अपेक्षित साधी जीवनपद्धती स्वीकारली. अर्थात, पुढे प्रत्येक वेळी असे घडलेच असे नाही.

प्रचारक असतानाही संघाच्या करड्या शिस्तीची बंधने सैल करू पाहणारा तो प्रचारक म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी! वडनगरसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेल्या नरेंद्रचे वडील रेल्वे स्थानकावर चहाची टपरी चालवित असत. नरेंद्रही त्यांना मदत करीत असे. टपरीवाल्याचा मुलगा ते गुजरातचे मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या नरेंद्र मोदींची कामगिरी थक्क करून टाकणारी आहे.

सर्वसामन्यांची मने जिंकणारी कार्यपद्धती, प्रशासन तसेच अधिकाऱ्यांवर असलेली पकड, विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती, राजकीय डावपेच आखण्यातील हातोटी व उपजत असलेले संघटन कौशल्य असे अनेक गुण गुजरातमधील निवडणुकीदरम्यान जवळून अनुभवता आले.

मोदी हे अहमदाबादमध्ये प्रचारक असताना ते संघ कार्यकर्त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा "वार लावून' जेवायला जात असत. परशुराम सहस्रभोजनी यांच्याकडेही ते आठवड्यातून एकदा-दोनदा जेवायला जायचे. नंतर संघाला चांगले दिवस आले आणि संघ कार्यालयांमध्येच जेवणाची व्यवस्था होऊ लागली; पण आपण ज्यांचे मीठ खाल्ले त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतरही मोदी विसरले नाहीत. ज्यांच्या घरी आपण "वार लावून' जेवलो त्या सर्व कुटुंबांची मोदी यांनी त्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांनी आमच्यासारख्या मोजक्‍या आठ-दहा कुटुंबीयांना मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रणही दिले, अशी आठवण सहस्रभोजनी कुटुंबीय आवर्जून सांगतात.

शिक्षकांनाही मोदींचा तोच न्याय! आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला शिक्षणाचे धडे देणाऱ्या 144 शिक्षकांचा सत्कार मोदींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर केला. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी स्वतःची "कॉमन मॅन' अशी प्रतिमा निर्माण करण्यास प्रारंभ केला आणि त्यामध्ये ते भलतेच यशस्वी झाले.

मोदी विवाहित असले तरी ते अविवाहिताप्रमाणेच आयुष्य जगले. इतर राजकीय नेत्यांच्या आजूबाजूला असणारे नातेवाईकांचे कोंडाळे त्यांच्याभोवती नाही. हा मुद्दाही मोदींच्या फायद्याचा ठरला. स्वच्छ प्रतिमेमुळेच "खातो नथी, खावा देतो नथी' ही मोदींची घोषणा बऱ्यापैकी यशस्वी ठरली. मोदींच्या कार्यकाळात गुजरातमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची अवस्था खूपच "टाईट' आहे, अशी चर्चा अनेक ठिकाणी कानावर येत होती. या चर्चेला थोडे पाठबळ मिळाले ते मोदीविरोधी "अजेंडा' राबविणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराकडून!

संबंधित पत्रकाराने आयसीआयसीआय बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. कामत यांची एकदा मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर कामत यांनी त्या पत्रकाराला मोदींबद्दल सांगितले. कामत म्हणाले, ""मध्यंतरी मोदी आणि माझी भेट झाली. तेव्हा मोदी यांनी मला व बॅंकेला सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच त्यांनी स्वतःच्या मोबाईलचा क्रमांक मला दिला. गुजरातमध्ये कोठेही तुम्हाला आडमार्गाने पैसे मागितले किंवा काही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर थेट मला फोन करा. तो अधिकारी निलंबित झालेला असेल, असे मोदींनी सांगितले.'' कामत यांना गुजरातमध्ये तसा अनुभव आला नाही. अर्थात, राज्यात सर्वच खात्यांमध्ये अशी परिस्थिती असेल, असा दावा कोणीच करणार नाही. पण म्हणून कामत यांना आलेला अनुभव अगदीच दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

कॉंग्रेस, विविध स्वयंसेवी संस्था, अल्पसंख्याक व देशभरातील धर्मनिरपेक्ष संघटनांनी मोदींच्या विरोधात आघाडी उघडली होती. तथाकथित तटस्थ प्रसिद्धीमाध्यमेही मोदींवर खार खाऊन होती. हे कमी म्हणून की काय भारतीय जनता पक्षासह संघ परिवारातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, किसान संघ, विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल आदी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनीही मोदींविरुद्ध दंड थोपटले होते. "हिंदू सारा एक'चा नारा देऊन भाषणे ठोकण्यात "प्रवीण' असलेल्या विश्‍व हिंदू परिषदेच्या एका नेत्यानेही मोदींविरुद्ध आघाडी उघडली. केशुभाईंच्याच पटेल जातीच्या असलेल्या या नेत्याने शेकडो साधूंना मोदींविरुद्ध रस्त्यावर उतरविले. मोदींच्या कारकिर्दीत एक लाख गाई व अनेक साधूंची हत्या झाली, असे आरोप केले. "ये तो सारे संत है, मोदी तेरा अंत है'' अशा घोषणा असलेल्या जाहिराती प्रकाशित केल्या. पण तरीही मोदींची लोकप्रियता कमी झाली नाही.

इतके आरोप-प्रत्यारोप होऊनही मोदींची प्रतिमा मलिन झाली नाही किंवा त्याचा फटका मोदींना बसला नाही, असे का याबाबत स्पष्टीकरण देताना भाजपचे राज्यसभेतील खासदार जयंतीलाल बारोट यांनी मजेदार किस्सा ऐकविला. गाबाजी ठाकूर नावाचे जनसंघाचे एक जुने आमदार होते. ठाकूर यांच्या ताब्यात असलेली जमीन राज्य सरकारला हवी होती. मात्र, ठाकूर हे जमीन सरकारच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. ठाकूर हे आमदार असल्यामुळे सरकार जोर जबरदस्ती करून कारवाई करू शकत नव्हते. अखेर सरकारने वृत्तपत्रांमधून ठाकूर यांच्याविरुद्ध अपप्रचार सुरू केला. त्यांची निंदानालस्ती सुरु केली. चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. एकवेळ असे वातावरण निर्माण झाले की, ठाकूर यांची अनामत रक्कम जप्त होणारच; पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गाबाजी ठाकूर हे थोड्या थोडक्‍या नव्हे तर तब्बल 28 हजार मतांनी निवडून आले. त्यामुळे मोदींवर कोणीही कितीही चिखलफेक केली तरी त्याचा फटका न बसता मोदींना फायदाच होतो, अशी भाजप कार्यकर्त्यांची समजूत आहे.

सुरेश मेहता, काशीराम राणा आणि केशुभाई पटेल यांनी बंड करूनही मोदी तरले. कारण त्यांनी गेली विधानसभा तसेच महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षविरोधी काम केले होते. ही मंडळी उघडपणे समोर आली. याची कुणकुण मोदींना पूर्वीपासून होती. त्यामुळेच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी गेल्या दीड वर्षापासून केली होती. मोदींनी एकूण 55 पटेल उमेदवार उभे केले. मोदी स्वतः इतर मागासवर्गीय आहेत. या समाजाची 55 टक्के मते गुजरातेत आहेत. पटेल समाजाला जवळ आणण्याचे प्रयत्न करताना मोदींनी इतर मागासवर्गीयांच्या 55 टक्‍क्‍यांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

शिवाय भाजप किंवा पूर्वीच्या जनसंघामध्ये बंडखोरीला मतदार व कार्यकर्त्यांकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही, हा इतिहास आहे. अगदी बलराज मधोकांपासून ते उमा भारतींपर्यंतचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे गुजरात त्याला अपवाद ठरणार नाही, हे निश्‍चितच होते. उत्सुकता होती ती या बंडखोर मंडळींची ताकद किती आहे, हे जाणून घेण्याची! आणखी एक गोष्ट म्हणजे चिमणभाई पटेल असो किंवा शंकरसिंह वाघेला गुजरातने कधीही बंडखोरांना पुन्हा संधी दिलेली नाही. त्याचीच पुनरावृत्ती केशुभाई आणि मंडळींबाबत झाली आणि बंडखोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक जिंकण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न सपशेल फसला.

मोदींची आक्रमक कार्यशैली, प्रभावी वक्तृत्व आणि गुजराती अस्मितेला साद घालण्याची प्रवृत्ती यामुळे महिला आणि युवा वर्ग त्यांचा विशेष चाहता आहे. जेव्हा हा वर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडला तेव्हाच मोदींचा विजय निश्‍चित झाला होता. शिक्कामोर्तब 23 डिसेंबरला झाले इतकेच!

Friday, December 21, 2007

400 हून अधिक डिश

खवय्यांची तबीयत "खूष' करणारे "खुशबू'!
खवय्यांना खूष ठेवण्यासाठी वेगळ्या डिश तयार करणारे रेस्तरॉं, अशी "खुशबू'ची ओळख करून द्यावी लागेल. वैविध्यपूर्ण व चविष्ट खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतरही खिशाला जास्त चाट बसत नाही, असा अनुभव आपल्याला "खुशबू'तून बाहेर पडताना येतो. काही वर्षांपूर्वी हिराबाग येथे सर्वप्रथम "खुशबू' सुरू झाले. नंतर "खुशबू'ने धनकवडीला स्थलांतर केले. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर "खुशबू रेस्तरॉं'ची शाखा आहे.

"खुशबू'मध्ये जसे वेगळ्या डिशचे पर्याय उपलब्ध आहेत, तसे जेवण्यासाठी बसायचे कुठे, यासाठीही तीन पर्याय आहेत. पहिला म्हणजे हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतरचा "गार्डन'चा! आजूबाजूला शोभेची झाडे व एका कडेला पावभाजी व तवा पुलाव यांचा स्टॉल, छताला टांगलेल्या फळांच्या माळा व प्लॅस्टिकच्या लाल-पिवळ्या खुर्च्या असे अगदी "टिपिकल' वातावरण "गार्डन'मध्ये आहे. थंडगार हवेत बसून गरमागरम जेवण घ्यायचे असेल तर "गार्डन' एकदम "बेस्ट'!

नाहीतर मग आतमध्ये जाऊन "कुशन'चा सोफा अथवा खुर्च्यांवर आरामत बसून निवांत आस्वाद घ्या. "इंटेरिअर' देखील एकदम झकास आहे. लाकडी कलाकुसर, वेगवेगळ्या विषयांवरील पेंटिंग आणि आपल्याला हवा तितका उजेड ठेवता येईल, अशी प्रकाशरचना यामुळे आतही "बोअर' होत नाही. मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाइकांना "पार्टी' द्यायची असेल तर मग वातानुकूलित हॉलच बुक करून टाका! तेथे 28 जण एकावेळी जेवू शकतात.

सदाशिव सॅलियन हे "खुशबू'चे मालक. सॅलियन मूळचे उडुपीचे; पण लहानपणापासून वास्तव्याला पुण्यात. त्यांनी "रेस्तरॉं'मध्ये पडेल ते काम करण्यापासून सुरवात केली. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे "रेस्तरॉं' थाटले.

"खुशबू'मध्ये मुळातच गरम मसाला व तेल कमी टाकून खाद्यपदार्थ तयार केले जातात. भाज्या शिजविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी फेकून न देता ग्रेव्ही, करी अथवा सूप तयार करताना ते वापरले जाते. त्यामुळे भाज्यांमधील सत्त्व वाया जात नाही. पदार्थ तयार करताना कृत्रिम रंग न वापरता भाज्यांपासूनच हिरवा, लाल किंवा तपकिरी असे रंग तयार करतात, असे सॅलियन यांनी स्पष्ट केले.

चायनीज, पालक आणि बेबीकॉर्न सूप अशा अनेक "व्हरायटी' येथे उपलब्ध आहेत; पण सॅलियन यांच्या आग्रहावरून आम्ही जिंजर लेमन हे पचनास उपयुक्त आणि "ऍसिडिटी' घटविणारे पेय घेऊन उदरभरणाची सुरवात केली. थोडासा बदल म्हणून असा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही.

"" "इडली चिली फ्राय' हा पदार्थ पुण्यात सर्वप्रथम आम्ही तयार केला आणि नंतर मग इतर रेस्तरॉंमध्ये तो मिळू लागला. मग आम्ही "इडली शेजवान' या आणखी एका नव्या पदार्थाची निर्मिती केली. आम्ही नेहमीचे पदार्थ देत असतानाच अशा पद्धतीने नव्या "डिश' तयार करतो,'' असे सॅलियन सांगतात. "इडली शेजवान'मध्ये इडलीचे छोटे तुकडे "कॉर्न फ्लॉवर'मध्ये "डिप' करून तपकिरी होईपर्यंत तळून घेतले जातात. मग ते "शेजवान सॉस'मध्ये घोळून इतर सॉसेस टाकून "सर्व्ह' केले जातात. "स्टार्टर'मध्ये ही "खुशबू'तील सर्वात वेगळी डिश!

"व्हेज मुमताज', "व्हेज लाहोरी', "व्हेज मिलीजुली' व "मेथी चमन' यांच्यासह एकूण 45 वेगवेगळ्या पंजाबी डिश येथे उपलब्ध आहेत. पनीर व मश्रुमचे पदार्थ स्वतंत्रपणे "मेनूकार्ड'मध्ये देण्यात आले आहेत. शेजवान सॉस वापरून तयार केलेली "पनीर शेजवान चिलीमिली' ही लालभडक मिक्‍स भाजी, काजू तसेच "व्हाईट ग्रेव्ही'सह "सर्व्ह' केला जाणारा पनीर तवा स्पेशल व पनीरचे बारीक तुकडे "कॉर्नफ्लॉवर'मध्ये "डिप' करून नंतर ते तळून "स्पायसी ग्रेव्ही'सह वाढला जाणारा "पनीर घुंगरू' विशेष लोकप्रिय.

मश्रुमच्या यादीत "मश्रुम शबनम', "मश्रुम बटर मसाला', "मश्रुम हंडी', "मश्रुम पालक', "मश्रुम पनीर', "मश्रुम करी' व "बेबी कॉर्न मश्रुम मसाला' अशी "व्हरायटी' आहे. आम्ही "व्हेज मराठा' आणि "व्हेज गार्डन' या वेगळ्या भाज्या खाण्यासाठी उत्सुक होतो. त्यामुळे "स्टाटर' न मागविता आम्ही "मेन कोर्स'कडे वळलो.
"व्हेज कोल्हापुरी'चे नाव बदलून "व्हेज मराठा' असे बारसे केले आहे की काय, अशी शंका आपल्याला येते; पण तसे नाही. "व्हेज मराठा' म्हणजे सर्व भाज्या उकडून त्यांचे पकोडे तयार केले जातात. मग ते "ग्रेव्ही'मध्ये "डिप' करून त्यावर लाल मिरचीचा तडका मारला जातो. "व्हेज कोल्हापुरी'इतकीच तिखट पण एकदम वेगळी पद्धत त्यामुळे ही "डिश' आम्हाला प्रचंड आवडली. आम्ही मागविलेली "व्हेज गार्डन' ही "डिश' देखील पसंतीस पडली. हिरवा, तपकिरी आणि लाल अशा तीन रंगांमधील तीन वेगळ्या चवींच्या भाज्या एकाच "डिश'मध्ये मिळतात.

पंजाबी, चायनीज, इडली, डोसा, उत्तप्प्याचे विविध प्रकार, पिझ्झा, पास्ता आणि सॅंडविच यांच्यासह आइस्क्रीम, मिल्कशेक, ज्यूस आणि फालुदा यांच्या 400 हून अधिक डिशमधून आवडीचे पदार्थ निवडता येतात. शिवाय चौघांच्या कुटुंबाला सूप, "स्टार्टर', रोटी-सब्जी, राइस व आइस्क्रीम अशा भरगच्च जेवणाचे बिल तीनशे ते साडेतीनशे रुपये येते.

खुशबू फॅमिली रेस्तरॉं
बिबवेवाडी-कोंढवा रस्ता,
पुणे - 411037.
020-24275573, 24275266

Monday, December 17, 2007

Modi wave in Gujarat


BJP will get not less 120

Now its confirm that Narendra Damodardas Modi will get majority in Gujarat and he will become the Chief Minister once again. This is based on my observation when I was in Gujarat and not on the Exit Poll results declared after second phase of elections. Before elections conclusions were drawn that because of Keshubhai Patel and other rebels Bharatiya Janata Party will loose its majority in Assembly. Congress will gain more seats that last time and they will fight neck and neck to BJP.

Though rebels form Vishwa Hindu Parishad, Rashtriya Swayamsevak Sangh and BJP stand against Modi. Congress, secularist parties as well as social organizations and so-called impartial Media tried their best to demolish Modi. But in democracy one who has public support is the king. In Gujarat Modi has tremendous public support and they are crazy for his personality. They love his speeches, rallies and his views.

When you visit Gujarat then you get realization of the fact that Keshubhai and other rebels are not that much effective. Media has made hype of it and Keshubhai is again came at the center of the elections. Actually he and his supporters were against Modi in last assembly elections also. But this time they had come openly against Modi. But CM had known this so he started his campaign from last one and half year. Interesting fact is that Keshubhai and his supporters were against Modi in Municipal Corporation, District Panchayat and Gram Panchayat elections also. But that time BJP emerge as single largest party in many areas against all odds. So BJP leaders and workers are not afraid of Keshubhai and his gang.

Another thing is that Congress party has no leader who is capable to fight against Modi. Gujarat Pradesh Congress Party President Bharat Solanki, Ex BJP MP and Now Congress Minster Shankarsingh Waghela and Leader of Opposition Arjun Modwadia are not of that caliber of Modi. He is excellent speaker, good administrator and born leader. He has charismatic personality. People are crazy to hear his speeches. Thousands of people gathered to hear him in a single Corner meeting. Modi takes around eight to ten rallies a day. So one gets idea of his popularity. BJP has created Modi Raths, where people can hear Modi’s recorded speech on TV. Hundreds of people are watching these recorded speeches on TV.

Another thing is that Congress party’s main campaign was against Modi and they never tried to give their ideas and never project any leader as their CM after elections. Congress party’s agenda was to malign Modi’s image. Instead of doing this if Congress party has gone without naming Modi then they would be in better position. Congress President Sonia Gandhi unnecessarily brought Soharabudhin issue in the elections. Digvijaya Singh called BJP workers as Hindu Militants. Because of this once again development issues gone to back seat and other issues, which favors Modi and his Party, come to forefront. This is most effective aspect of the elections.

Another thing is that last time elections were happened on the background of Godhra Carnage. So that time voting percentage was high as compared to then last elections. But this time voters come out heavily and same percentage was maintained though there was no such issue on high. The average voting in Gujarat in various elections is around 50 percent. But this time 60 percent voting means around eight to ten percent votes is increased. Another thing is that percent of women and young voters is remarkable. Modi is more popular than any other leader in Gujarat in these two sections of society.
When I visited Surat, Vadodara and Ahemdabad I realized the fact that Modi has great support and Modi’s victory is now just a formality. But all the media persons were trying to develop such a picture that he is trailing in elections. But when results of exit polls come out everybody was amazed when they showed that BJP will get around 100 to 110 seats. But my calculation is that Modi (BJP) will get not less than 120 seats, just seven less than last time. If we consider all the factors discuss above according to my predictions BJP will loose only 5 to 10 seats in Saurashtra and Central Gujarat but they will cover that loss in North Gujarat, where Congress facing rebel candidates.

Saturday, December 15, 2007

रामकृष्ण रेस्तरॉं


"रामकृष्ण'मध्ये जेवा निवांत;
पण शेवटी "गडबड' हवीच !

कॅम्प व शुद्ध शाकाहारी "रेस्तरॉं'...? "ये बात कुछ हजम नही हुई...' असे जर वाटत असेल तर एकदा तरी वेस्टएंड चित्रपटगृहासमोरील "रामकृष्ण रेस्तरॉं'मध्ये जायलाच हवे.या रेस्तरॉंचे व्यवस्थापक आहेत देवेंद्र शेट्टी आणि या ग्रुप ऑफ हॉटेल्सचे प्रमुख आहेत सोमनाथ शेट्टी. सुरवातीला विलेपार्ले, त्यानंतर लोणावळा व सात वर्षांपूर्वी कॅम्पमध्ये हे "रेस्तरॉं' सुरू झाले. दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज व चाट यातील "स्टार्टर'पासून ते "डेझर्ट'पर्यंत एकूण 362 पदार्थांचा भरगच्च "मेनू' सज्ज आहे.

"रामकृष्ण'च्या आवारात शिरताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती "रेस्तरॉं'ची ब्रिटिशकालीन भव्य दगडी वास्तू. वास्तूचे बहिर्रंग जुनेच असले तरी "रेस्तरॉं'चे "इंटेरियर' मात्र एकदम झकास. भव्य हॉल, त्यामध्ये भिंतीवर लाकडी नक्षीकाम, बसण्यासाठी लाकडी खुर्च्या आणि कोच, छताला टांगती झुंबरे. ही अंतर्गत सजावट पाहिल्यावर एखाद्या राजवाड्यामध्येच जेवायला आलो आहोत, असे वाटते. एकूण काय तर "रेस्तरॉं'चा "माहोल' एकदम मस्त आहे. "रामकृष्ण'चे आवार भव्य असल्याने "पिक अवर'मध्येही "पार्किंग'ची विशेष अडचण जाणवत नाही. "रेस्तरॉं'ची क्षमता 320 जणांची असली तरी कदाचित गर्दीमुळे थोडे थांबावे लागू शकते; पण घाबरू नका तुम्ही पाच असा वा पंचवीस, "ऑर्डर' दिल्यानंतर दहा मिनिटांमध्ये पदार्थ "सर्व्ह' झाले नाही तर मग बोला.

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये अर्थातच इडली, डोसा, उत्तप्पा आणि टोमॅटो ऑम्लेट यांचेच वर्चस्व. डोसाचे 27 विविध प्रकार "रामकृष्ण'मध्ये मिळतात. साधा, मसाला, कट, स्प्रिंग व म्हैसूर मसाला याप्रमाणेच मूँग डोसा हा मुगाच्या डाळीपासूनचा डोसा वेगळा म्हटला पाहिजे. कांदा रवा डोसा हीदेखील हटके "डिश'. उत्तप्प्याचेही अकरा प्रकार उपलब्ध असल्याने तुम्हाला निवडीची प्रचंड संधी आहे.

"चाट'मध्ये "क्रिस्पी फ्राय इडली चाट' आवर्जून खाण्यासारखा आहे. तळलेल्या इडलीवर गोड दही, तीन-चार प्रकारचे सॉस, चाट मसाला आणि शेव टाकून तयारी केलेल्या "इडली चाट'च्या भन्नाट "कॉंबिनेशन'ला मागणी असते. दिल्लीचा प्रसिद्ध "दही भल्ले पापडी चाट', कॉर्न भेळ तसेच "टोकरी चाट' हे पर्यायही आहेतच.

सूपमध्ये चायनीज व इतरत्र मिळणारी सर्व सूप आहेतच. पण "पालक सूप' हे "रामकृष्ण'चे वेगळेपण. उकडलेल्या पालकाची पाने "मॅश' करून घट्टपणासाठी त्यात "कॉर्न फ्लॉवर' किंवा आरारोट मिसळले जाते. मग थोडेसे क्रीम' आणि "गार्निशिंग'साठी किसलेले पनीर. नेहमीच चायनीज किंवा टोमॅटो सूप घेण्यापेक्षा हा पर्याय अधिक चांगला वाटतो.

"पंजाबी'मध्ये इतरत्र मिळणारे सर्वच पदार्थ येथे आहेत; पण त्यातही आलू मेथी, पनीर बटर मसाला, व्हेज चिली मिली, मकई सिमला, बेबीकॉर्न जालफ्रेझी हे पदार्थ खास! पनीर बटर मसाला हा पदार्थ इतर "रेस्तरॉं'मध्ये गोडसर असतो; पण "रामकृष्ण'मधील पनीर बटर मसाला गोड नाही. त्यामुळे चवीमध्ये फरक जाणवण्यासारखा आहे. "व्हेज चिली मिली' एकदम "स्पायसी'! सर्व भाज्या एकत्र परतून नंतर ग्रेव्ही व बटरमध्ये टाकून लसणाचा तडका दिला जातो. त्यामुळे "व्हेज कोल्हापुरी'पेक्षा "व्हेज चिली मिली'च अधिक चांगला पर्याय आहे. "पनीर भुर्जी' देखील "ट्राय' करायला हरकत नाही.

व्हेजमध्ये "चायनीज'ही आहे. त्यातही "इडली चिली' हे वैशिष्ट्य! इडलीचे तुकडे करून त्याला कॉर्नफ्लॉवरचे आवरण चढविले जाते. हे तुकडे "डीप फ्राय' करतात. मग तळलेल्या मिरच्या व चायनीज सॉसमध्ये इडलीचे तळलेले तुकडे घोळले जातात. सुरवातीला मन्च्युरीयन खातो आहोत की काय असेच वाटते; पण नंतर इडलीची चव कळते. लसूनी पनीर, पनीर जिंजर, पनीर, चिली, पनीर शेजवान व मशरूम बांबू शूट्‌स अशी "व्हरायटी' चायनीज "सब्जी'मध्ये आहे.

रोटी व नानमध्ये साधी आणि बटर यांच्याप्रमाणेच मेथी, पुदिना तसेच गार्लिक असे प्रकारही आहेत, तर राईसमध्ये व्हेज बिर्याणीप्रमाणेच काश्‍मिरी, पीज, शाहजानी, चीज, पनीर पुलाव अशी रेलचेल आहे; पण पालक खिचडी, दाल खिचडी किंवा दही खिचडी यांची मजा काही औरच!

आइस्क्रीम, फालुदा, ज्यूस आणि मस्तानी यांनी "मेनू कार्ड'चे रकानेच्या रकाने भरले आहेत; पण त्यातही लक्ष वेधून घेणारे नाव म्हणजे "गडबड'. उडुपीचा हा प्रसिद्ध पदार्थ. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, चॉकलेट व एखादे "सिझनल' आइस्क्रीम एकत्र केले जाते. त्यात फ्रूट सॅलड व जेली टाकले जाते. नंतर चेरी व "ड्राय फ्रूट' टाकून सजवितात. आइस्क्रीमवर तुटून पडणाऱ्यांनी शेवट "गडबड'नेच केला पाहिजे...!

हॉटेल रामकृष्ण
6 मोलेदिना रस्ता,
वेस्टएंड चित्रपटगृहासमोर,
कॅम्प, पुणे - 41101.
020-26363938

Tuesday, December 11, 2007

Lackluster Speech of PM

NO MODI IN MANMOHAN'S SPEECH

Prime Minister Dr. Manmohan Singh attended a rally in Vadodara but his speech was not only lacking enthusiasm and figures or statistics but PM didn’t show much courage to criticize the Gujarat Chief Minister Naredra Modi.

PM in his 25 minutes long speech and 15 minutes press conference didn’t took name of Mr. Modi and criticize the policies and decisions took by government just without naming the chief of that state ministry. When Media persons asked him about not to criticizing Modi, he denied answering the question and turning to another issue. He also didn’t comment about election commission’s notice to UPA chairperson Sonia Gandhi and Congress Leader Digvijaya Singh. He just said that EC is doing their work and I will not interfere in it.

He also pointed out that the first phase of voting in Gujarat and declaring Lal Krishna Advani as Bhartiya Janata Party’s Candidate for Prime Minister’s post must have some links. BJP’s central leadership is also afraid of Modi and they still think that if Modi wins in Gujarat then he will emerge as big problem for central leadership. That why BJP leaders hurriedly announced the name of Advani as next candidate of Prime Minister.

Manmohan Singh also clarified that the development occurred in the state was with central funds and not with the funds of state government. State government is taking false credit of the development. He also claimed that though Gujarat is development track it lacks inclusiveness. Minorities, Advises, SC, ST and other backward class peoples are not included in this development process. If Congress comes to the power then they will make such a process that peoples from all castes and communities will get their rights.

He didn’t give any figure or statistics of financial aid or funds given to Gujarat by centre. Around two to three thousands congress workers were present at the rally.

No Response…

Thousands of peoples are coming to attain the rally of Gujarat Chief Minister Narendra Modi. Other leaders including leaders of Modi’s own party BJP are not much interested to give speech as there is not much crowd to hear them. In Vadodara only 500 to 600 people were present in BJP chief Rajnath Singh’s rally. Sushama Swaraj was also upset with the less response for her rally in Saurashtra. MP of Gandhinagar and former BJP President Lal Krishna Advani also not dared to take a single rally or come to campaign. This is the tragedy of Gujarat campaign. Here only Modi is the person who is attracting thousands of people.

Friday, December 07, 2007

उदरभरणही....मनोरंजनही !


व्हेज रेस्तरॉं म्हटले, की डोळ्यासमोर येते ते "टिपिकल' पंजाबी, साउथ इंडियन, मराठी किंवा गुजराती. फार तर चायनीज. हे पदार्थ एकाच ठिकाणी मिळणारी रेस्तरॉंही आहेत; पण या पदार्थांच्या जोडीला इटालियन, मेक्‍सिकन, थाई व लेबनीज पदार्थदेखील त्याच व्हेज रेस्तरॉंमध्ये मिळाले तर? आहे अशी व्यवस्था असलेले खऱ्या अर्थाने "मल्टी क्‍युझीन रेस्तरॉं' सातारा रस्त्याजवळील मुकुंदनगरमध्ये आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे रेस्तरॉं आहे "मारीगोल्ड'.

एकाच इमारतीत तळमजल्यावर "बोलिंग ऍली', पहिल्या मजल्यावर "मल्टी क्‍युझीन रेस्तरॉं', दुसऱ्या मजल्यावर बॅंक्‍वेट हॉल, लहान मुलांसाठी "व्हिडिओ गेम्स' आणि "स्पोर्टस बार' अशा निरनिराळ्या सुविधा चिराग जैन यांच्या "थ्री डी डेस्टिनेशन'मध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा उदरभरणाच्या जोडीला मनोरंजनाचा विचार जैन यांनी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. टापटीप, मांडणीतील सुटसुटीतपणा व भरपूर प्रकाश यामुळे रेस्तरॉंला वेगळाच "रिचनेस' आला आहे. शिवाय एकाच वेळी 108 जण बसतील इतकी आसन व्यवस्था असल्यामुळे जास्त थांबण्याची गरजही नाही.

इडली-सांबारपासून ते "थाई करी'पर्यंत, "खोया काजू मटर' हंडीपासून ते पास्ता-पिझ्झापर्यंत व लखनवी-हैदराबादी बिर्याणीपासून ते "सिझलर्स'पर्यंत विविध ठिकाणच्या खाद्यपदार्थांची रेलचेल "मारीगोल्ड'मध्ये आहे. त्यामुळे एकदा का "मेन्यू कार्ड' हातात घेतले, की कोणता पदार्थ घ्यावा, अशा संभ्रमात पडला नाहीत तरच नवल! अशा परिस्थितीत नेहमीचे भारतीय पदार्थ न मागविता "कॉन्टिनेन्टल' किंवा थाई-लेबनीज पदार्थ "टेस्ट' करा.

"लेबनीज फूड' म्हणाल तर "फलाफेल' विशेष लोकप्रिय आहे. कोबी, सिमला मिरची, भाज्यांचे तुकडे, काबुली चणे, मटार पॅटीस आदी पदार्थांचे "ताहिना' आणि "लेबनीज रेड सॉस'मध्ये घोळून सारण तयार केले जाते. हे सारण मक्‍याच्या पिठापासून तयार केलेल्या पातळ पोळीमध्ये भरून प्रथम "शॅलो फ्राय' आणि नंतर "बेक' केले जाते. फार तिखट नसलेला हा पदार्थ "स्टार्टर' म्हणून "सर्व्ह' केला जातो. ताहिनी या लेबनीज सॉसची चव विशेष जाणवते.

तुम्हाला थोडी "स्पायसी' डिश हवी असेल, तर "मेक्‍सिकन फूड'च्या यादीतील "चिमचंगाज' मागवा. उकडलेले मटार, घेवडा, बेबी कॉर्न, अमेरिकन कॉर्न आणि ढोबळी मिरची यांच्यापासून सारण तयार करून स्वादासाठी टोमॅटो सॉस, चीज, मिरपूड, ओरिगानो व इतर मसाले वापरतात. हे सारण मक्‍याच्या पिठाच्या पातळ पोळीवर पसरून त्याचा रोल तयार करतात. हा रोल "शॅलो फ्राय' व "बेक' करून "साल्सा' अर्थात "मेक्‍सिकन सॉस' सोबत दिला जातो.

"पास्ता'च्या तीन-चार प्रकारांपैकी "अरेबिता पास्ता विथ रेड सॉस' ही खासियत! टोमॅटो, ओरिगानो, मिरपूड, तुळशीची पाने आदी वापरून तयार केलेला सॉस म्हणजे अरेबिता. अरेबिता वापरून तयार केलेला "पास्ता' नुसता पाहिला, की तोंडाला पाणी सुटणारच ! कधी एकदा हे संपवितो, असे तुम्हाला न वाटल्यासच नवल. अरेबिता पास्ता व त्यावर किसलेले चीज म्हणजे केवळ लाजवाब. सोबतीला आले, लसूण, तिखट मिरची वापरून केलेला "रेड सॉस' आहेच.

"सिझलर्स'मध्ये "इंडियन सफारी' हा नावाप्रमाणेच थोडासा भारतीय चवीकडे झुकणारा प्रकार. गरमागरम बिडाच्या तव्यावर कोबीच्या पानात ठेवलेला भात थेट तुमच्या टेबलवरच आणून ठेवतात. वाफा आणि धूर अशा मिश्रणात समोरची डिश इतकी "टेम्टिंग' असते, की विचारता सोय नाही. शिवाय "बेबी कॉर्न' व "फिंगर चिप्स' यांनी ही डिश गार्निश केलेली असते. सोबतीचा "रेड सॉस' चव वाढविणारा.

छोट्या पण गरम इडलीवर लोणी लेपून सांबारमध्ये डुबणाऱ्या अशा बारा इडल्या एकाच डिशमध्ये आपल्यासमोर आणल्या जातात. हलका फुलका आहार घ्यायचा असेल, तर धाकट्या इडलीची (इडीट्टल) ही डिश जरूर खा. त्याचप्रमाणे "6 लिट्‌ल यूएफओ' अर्थात विविध भाज्या आणि सॉसेस यांचे टॉपिंग असलेल्या सहा उत्तप्प्यांची "डिश' हे दक्षिण भारतीय "मेन्यू'तील वेगळेपण!

याशिवाय तालू मे, टोमॅटो का शोरबा, बॅंकॉक रेड करी, करारी नझ्झा, पनीर पीपर शाश्‍लिक, मसाला दाल खिचडी, चिली कॉरिएन्डर राइस व कॉर्न टोमॅटो भरीत हे पदार्थही आवर्जून खाण्याजोगे आहेत. ... आणि हो. जेवण झाल्यानंतर विविध "डेझर्टस' आहेतच; पण तुम्ही अस्सल कॉफीप्रेमी असाल तर फक्त एक कप कॉफी ऑर्डर करा. इतर पदार्थांप्रमाणे तुम्ही कॉफीवरही बेहद्द खूष होऊन घरी परताल याची हमखास खात्री!


मारीगोल्ड रेस्तरॉं
"थ्री डी डेस्टिनेशन',
सुजय गार्डन, मुकुंदनगर
पुणे, 411037.
वेळ सकाळी 11 ते रात्री 11.